!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (६ )
आज पालखीचे सासवडहून प्रस्थान सकाळी ८ वाजता झाले.प्रस्थानापूर्वी दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.पालखी तळावर वारकरी परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये दंग झालेले दिसुन येत होते.आज पालखीने बोरावके मळा, यमाईची शिवरी तसेच साकुर्डे याठिकाणी विसावा घेतला. माऊलींच्या पालखीचे स्वागत सासवड ते जेजुरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून तसेच पुष्पवृष्टी करुन केले .सुरुवातीला सासवडमध्ये पाऊस पडत होता.मध्यतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली.शिवरी यमाई पासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. पावसात भिजण्याचा आनंद खासकरून भाविकांनी लुटला. पावसात रस्त्याने चालताना वारकऱ्यांची कसरत होत होती. पाऊस नसलेल्या ठिकाणी रस्त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली होती.जेजुरी गाव जवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तसेच दिंड्याचे स्वागत भंडारा उधळून जेजुरीवासीयांनी केले.आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. तर रात्रीची निवास व भोजन व्यवस्था मुळचे एकंबेवासीय व सध्या जेजुरी येथे कार्यरत असणारे दत्ता चव्हाण यांनी केली होती.ज्याठिकाणी पालखी विसावा घेते त्या त्या गावाना यात्रेचे स्वरुप आलेले असते.
पालखी मार्गावर स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण ,बेटी बचाव बेटी पढाव अभियान यासारखे रथ प्रचार करताना दिसतात. राज्यातील विकासाच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी वारी हा उत्तम मार्ग आहे असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
आज पालखीचे सासवडहून प्रस्थान सकाळी ८ वाजता झाले.प्रस्थानापूर्वी दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.पालखी तळावर वारकरी परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये दंग झालेले दिसुन येत होते.आज पालखीने बोरावके मळा, यमाईची शिवरी तसेच साकुर्डे याठिकाणी विसावा घेतला. माऊलींच्या पालखीचे स्वागत सासवड ते जेजुरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून तसेच पुष्पवृष्टी करुन केले .सुरुवातीला सासवडमध्ये पाऊस पडत होता.मध्यतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली.शिवरी यमाई पासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. पावसात भिजण्याचा आनंद खासकरून भाविकांनी लुटला. पावसात रस्त्याने चालताना वारकऱ्यांची कसरत होत होती. पाऊस नसलेल्या ठिकाणी रस्त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली होती.जेजुरी गाव जवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तसेच दिंड्याचे स्वागत भंडारा उधळून जेजुरीवासीयांनी केले.आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. तर रात्रीची निवास व भोजन व्यवस्था मुळचे एकंबेवासीय व सध्या जेजुरी येथे कार्यरत असणारे दत्ता चव्हाण यांनी केली होती.ज्याठिकाणी पालखी विसावा घेते त्या त्या गावाना यात्रेचे स्वरुप आलेले असते.
पालखी मार्गावर स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण ,बेटी बचाव बेटी पढाव अभियान यासारखे रथ प्रचार करताना दिसतात. राज्यातील विकासाच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी वारी हा उत्तम मार्ग आहे असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८