!! गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने !!
!! बहुरूप शिक्षक !!
७३ व्या वर्षी कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होत्या. गांधीजींना त्यावेळी मोकळा वेळ असे. त्यांनी रामायण व महाभारताचे काही खंड कस्तुरबासाठी संपादित केले होते. ते रोज त्यांच्याबरोबर बसत आणि त्यांना भूगोल, गुजराथी साहित्य शिकवत. कस्तुरबानी मात्र त्यांच्या शिकवण्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. तुरुंगात असताना गांधीजींनी एका चिनी कैद्याला इंग्रजी शिकवलं, नंतर आयरिश तुरुंगधिकाऱ्याला गुजराती शिकवलं, नंतर भाचीच्या मुलीला, नातीला इतिहास, भूगोल आणि भूमिती शिकवली.
शिक्षक म्हणून स्वतःच्या क्षमतेबद्दल चांगलाच आत्मविश्वास होता. पण शिक्षक म्हणून त्यांची दृष्टी आणि शिकवण्याची पध्दत खूप वेगळी होती. दक्षिण आफ्रिकेत एक न्हावी,एक कारकून आणि एक दुकानदार अशा तिघांना इंग्रजी शिकायचे होते पण शिक्षकाला द्यायला पैसे न्हवते. नियमित वर्गांना जायला वेळ न्हवता. गांधीजी त्यांच्या घरी जात आणि ६ महिन्यात त्यांना हिशोब ठेवण्यापूरते आणि पत्र लिहिन्यापुरते इंग्रजी शिकवलं.
फिनिक्स आश्रमात तिथल्या मुलांसाठी गांधीजींनी प्राथमिक शाळा सुरु केली. ते स्वतः मुख्याध्यापक होते. इतर आश्रमवासी त्यांना मदत करत असत. अनेक धर्माचे विद्यार्थी तिथं होते आणि शिक्षक वेगवेगळ्या देशांतून आलेले असत.इंग्लंड, जर्मनी, भारत. शिक्षकांना शारीरिक श्रमाची इतकी कामं असत की कधीकधी ते शाळेत शेतातूनच घोट्यापर्यंत मातीचे, चिखलाचे पाय घेऊन येत. गांधीजी कधीकधी एखाद्या बाळाला हातात जोजवत शिकवत असत. गांधीजी ते स्वतः करत नाहीत असं कुठलंही काम विध्यार्थ्यांना सांगितलं नाही. घाबरट शिक्षक कधीही विध्यार्थ्यांना निर्भय बनवू शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता. शिक्षक स्वतः मुलासमोरचा आदर्श पाठ असायला हवा.
मुलांनी शारीरिक श्रमाची काम करावीत आणि सुदृढ व्हावं असे त्यांना वाटे. टॉलस्टॉय फॉर्मवर आणि साबरमती आश्रमातही गांधीजी मुलांना जोडे बनवायला शिकवत. मातृभाषेतून साहित्याचे धडे दिले जात. गांधीजींना गुजराथी, मराठी, हिंदी, उर्दू, तमिळ, इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा येत.
गांधीजी सहशिक्षणाचा प्रचार करत. "आपण मुलं मुली असा भेदभाव सोडला पाहिजे. मुलांना धोका पत्करण्याची परवानगी द्यायला हवी. मुलामुलींमध्ये काही चुकीची वर्तणूक घडली तर गांधीजी शुद्धीसाठी उपवास करायला बसत. विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असायला हवी. कधीही अर्थार्जन करु शकतील एवढी त्यांची तयारी असावी. मुलांना लेखनापूर्वी वाचायला शिकवावं यावर त्यांचा भर होता. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे असे ते मानत. स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची त्यांना लाज वाटे. ते शिक्षकांना सांगत की, मुलांना आधी सरळ रेषा, कंस, त्रिकोण, पक्षी, फुलं पान यांची चित्र काढायला द्या म्हणजे ती अक्षरं लिहू शकतील त्यांना गिरवावी लागणार नाहीत.
गांधीजींवर रस्कीन,टॉलस्टॉय आणि टागोरांच्या विचारांचा प्रभाव होता. शिक्षणतज्ज्ञ म्हणून जगात थोर प्रयोगवीरांमध्ये त्यांचा समावेश होईल. त्यांनी बिहारमध्ये काही शाळा सुरू केल्या. बंगालमध्ये एक राष्ट्रीय विद्यालय सुरु केलं आणि अहमदाबादमध्ये राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केले.
संदर्भ -- बहुरूप गांधी.
लेखक -- अनु बंदोपाध्याय
संग्राहक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
!! बहुरूप शिक्षक !!
७३ व्या वर्षी कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होत्या. गांधीजींना त्यावेळी मोकळा वेळ असे. त्यांनी रामायण व महाभारताचे काही खंड कस्तुरबासाठी संपादित केले होते. ते रोज त्यांच्याबरोबर बसत आणि त्यांना भूगोल, गुजराथी साहित्य शिकवत. कस्तुरबानी मात्र त्यांच्या शिकवण्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. तुरुंगात असताना गांधीजींनी एका चिनी कैद्याला इंग्रजी शिकवलं, नंतर आयरिश तुरुंगधिकाऱ्याला गुजराती शिकवलं, नंतर भाचीच्या मुलीला, नातीला इतिहास, भूगोल आणि भूमिती शिकवली.
शिक्षक म्हणून स्वतःच्या क्षमतेबद्दल चांगलाच आत्मविश्वास होता. पण शिक्षक म्हणून त्यांची दृष्टी आणि शिकवण्याची पध्दत खूप वेगळी होती. दक्षिण आफ्रिकेत एक न्हावी,एक कारकून आणि एक दुकानदार अशा तिघांना इंग्रजी शिकायचे होते पण शिक्षकाला द्यायला पैसे न्हवते. नियमित वर्गांना जायला वेळ न्हवता. गांधीजी त्यांच्या घरी जात आणि ६ महिन्यात त्यांना हिशोब ठेवण्यापूरते आणि पत्र लिहिन्यापुरते इंग्रजी शिकवलं.
फिनिक्स आश्रमात तिथल्या मुलांसाठी गांधीजींनी प्राथमिक शाळा सुरु केली. ते स्वतः मुख्याध्यापक होते. इतर आश्रमवासी त्यांना मदत करत असत. अनेक धर्माचे विद्यार्थी तिथं होते आणि शिक्षक वेगवेगळ्या देशांतून आलेले असत.इंग्लंड, जर्मनी, भारत. शिक्षकांना शारीरिक श्रमाची इतकी कामं असत की कधीकधी ते शाळेत शेतातूनच घोट्यापर्यंत मातीचे, चिखलाचे पाय घेऊन येत. गांधीजी कधीकधी एखाद्या बाळाला हातात जोजवत शिकवत असत. गांधीजी ते स्वतः करत नाहीत असं कुठलंही काम विध्यार्थ्यांना सांगितलं नाही. घाबरट शिक्षक कधीही विध्यार्थ्यांना निर्भय बनवू शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता. शिक्षक स्वतः मुलासमोरचा आदर्श पाठ असायला हवा.
मुलांनी शारीरिक श्रमाची काम करावीत आणि सुदृढ व्हावं असे त्यांना वाटे. टॉलस्टॉय फॉर्मवर आणि साबरमती आश्रमातही गांधीजी मुलांना जोडे बनवायला शिकवत. मातृभाषेतून साहित्याचे धडे दिले जात. गांधीजींना गुजराथी, मराठी, हिंदी, उर्दू, तमिळ, इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा येत.
गांधीजी सहशिक्षणाचा प्रचार करत. "आपण मुलं मुली असा भेदभाव सोडला पाहिजे. मुलांना धोका पत्करण्याची परवानगी द्यायला हवी. मुलामुलींमध्ये काही चुकीची वर्तणूक घडली तर गांधीजी शुद्धीसाठी उपवास करायला बसत. विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असायला हवी. कधीही अर्थार्जन करु शकतील एवढी त्यांची तयारी असावी. मुलांना लेखनापूर्वी वाचायला शिकवावं यावर त्यांचा भर होता. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे असे ते मानत. स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची त्यांना लाज वाटे. ते शिक्षकांना सांगत की, मुलांना आधी सरळ रेषा, कंस, त्रिकोण, पक्षी, फुलं पान यांची चित्र काढायला द्या म्हणजे ती अक्षरं लिहू शकतील त्यांना गिरवावी लागणार नाहीत.
गांधीजींवर रस्कीन,टॉलस्टॉय आणि टागोरांच्या विचारांचा प्रभाव होता. शिक्षणतज्ज्ञ म्हणून जगात थोर प्रयोगवीरांमध्ये त्यांचा समावेश होईल. त्यांनी बिहारमध्ये काही शाळा सुरू केल्या. बंगालमध्ये एक राष्ट्रीय विद्यालय सुरु केलं आणि अहमदाबादमध्ये राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केले.
संदर्भ -- बहुरूप गांधी.
लेखक -- अनु बंदोपाध्याय
संग्राहक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा