!! श्री भैरवनाथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फत्यापूर भेट !!
आज गुरुवार दिनांक ३० मे रोजी सातारा जिल्ह्यातील देशमुखनगर येथे एका विवाह समारंभानिमित्त गेलो होतो. तेथुन अगदी जवळ असलेल्या फत्यापुर गावी श्री भैरवनाथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास भेट देण्याचा योग आला.
माझे समवेत वर्णे येथील बळीराम पवार(पाटील ), दादासाहेब पवार, वर्णे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार बाईंग, राजकुमार काळंगे, फत्यापूर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक घाडगे (सर ) होते. अशोक घाडगे (सर), सेवा सोसायटीचे चेअरमन झाल्यापासून गावात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे दिसून आले. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न दिसुन आला. गावाशेजारी असणाऱ्या तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासाठी गावचे भूमिपुत्र राजेंद्र घाडगे त्याचबरोबर सह्याद्री साखर कारखान्याने भरीव मदत केलीअसल्याचे चेअरमन यांनी सांगितले. गावातील तरुणांनी उस्फुर्तपणे श्रमदान केले. विधायक विचार असतील तर लोकांचे सहकार्य लाभते.
बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्थांचा गैरवापर होताना दिसून येतो. "बसायला फटफटी व खायला सोसायटी "असे चित्र चेअरमनचे पुर्वी रंगवले जायचे. परंतु आधुनिक विचारांच्या व्यक्ती सहकारात आल्यातर गावाचा कसा कायापालट होतो हे फत्यापुर सोसायटीने दाखवुन दिले. सोसायटीच्या माध्यमातून पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सोसायटीच्या इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून एखादी योजना सुरू केली तर ती चिरकाल टिकते हेच दिसून येते.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकेंद्रात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. ग्रंथालयासाठी आवश्यक असणारे फर्निचर तयार करण्यात आले आहे. सी. सी.टी. व्ही. ची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात थोर व्यक्तीचे विचार प्रदर्शित केलेले दिसून आले. उदाहरणादाखल एक विचार येथे देत आहे.
" विद्येविना मती गेली;
मतिविना निती गेली;
नीतिविना गती गेली!
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले."
महात्मा जोतिबा फुले
हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले. जागेअभावी सगळ्यांचाच उल्लेख करता येत नाही. काहींनी पैश्याचा स्वरूपात तर काहींनी वस्तुस्वरूपात मदत केली आहे. तरीही विशेष सहकार्य केलेल्या काही व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल त्यामध्ये जलसंधारण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे, लोढा ग्रुप मुंबईचे व्हा. चेअरमन दादासाहेब गवळी, निवृत्त आयकर अधिकारी महादेव घाडगे, सिंदखेडराजा येथील तहसीलदार संतोष कणसे, निवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी मनोहर घाडगे, एरिक्सन पुणेचे मॅनेजर प्रकाश घाडगे, अभियंता नितीन घाडगे, विशाल कदम ,अनेक प्राथमिक शिक्षक आदि आहेत. अशोक घाडगे सरांचे कल्पक विचार आणि त्यांना ग्रामस्थांची उत्तम साथ असल्याने गावात कायापालट होताना दिसत आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे गावोगावी सुरु झाली तर ग्रामीण भागातील तरुणांचा प्रशासनातील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
आज गुरुवार दिनांक ३० मे रोजी सातारा जिल्ह्यातील देशमुखनगर येथे एका विवाह समारंभानिमित्त गेलो होतो. तेथुन अगदी जवळ असलेल्या फत्यापुर गावी श्री भैरवनाथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास भेट देण्याचा योग आला.
माझे समवेत वर्णे येथील बळीराम पवार(पाटील ), दादासाहेब पवार, वर्णे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार बाईंग, राजकुमार काळंगे, फत्यापूर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक घाडगे (सर ) होते. अशोक घाडगे (सर), सेवा सोसायटीचे चेअरमन झाल्यापासून गावात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे दिसून आले. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न दिसुन आला. गावाशेजारी असणाऱ्या तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासाठी गावचे भूमिपुत्र राजेंद्र घाडगे त्याचबरोबर सह्याद्री साखर कारखान्याने भरीव मदत केलीअसल्याचे चेअरमन यांनी सांगितले. गावातील तरुणांनी उस्फुर्तपणे श्रमदान केले. विधायक विचार असतील तर लोकांचे सहकार्य लाभते.
बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्थांचा गैरवापर होताना दिसून येतो. "बसायला फटफटी व खायला सोसायटी "असे चित्र चेअरमनचे पुर्वी रंगवले जायचे. परंतु आधुनिक विचारांच्या व्यक्ती सहकारात आल्यातर गावाचा कसा कायापालट होतो हे फत्यापुर सोसायटीने दाखवुन दिले. सोसायटीच्या माध्यमातून पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सोसायटीच्या इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून एखादी योजना सुरू केली तर ती चिरकाल टिकते हेच दिसून येते.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकेंद्रात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. ग्रंथालयासाठी आवश्यक असणारे फर्निचर तयार करण्यात आले आहे. सी. सी.टी. व्ही. ची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात थोर व्यक्तीचे विचार प्रदर्शित केलेले दिसून आले. उदाहरणादाखल एक विचार येथे देत आहे.
" विद्येविना मती गेली;
मतिविना निती गेली;
नीतिविना गती गेली!
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले."
महात्मा जोतिबा फुले
हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले. जागेअभावी सगळ्यांचाच उल्लेख करता येत नाही. काहींनी पैश्याचा स्वरूपात तर काहींनी वस्तुस्वरूपात मदत केली आहे. तरीही विशेष सहकार्य केलेल्या काही व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल त्यामध्ये जलसंधारण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे, लोढा ग्रुप मुंबईचे व्हा. चेअरमन दादासाहेब गवळी, निवृत्त आयकर अधिकारी महादेव घाडगे, सिंदखेडराजा येथील तहसीलदार संतोष कणसे, निवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी मनोहर घाडगे, एरिक्सन पुणेचे मॅनेजर प्रकाश घाडगे, अभियंता नितीन घाडगे, विशाल कदम ,अनेक प्राथमिक शिक्षक आदि आहेत. अशोक घाडगे सरांचे कल्पक विचार आणि त्यांना ग्रामस्थांची उत्तम साथ असल्याने गावात कायापालट होताना दिसत आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे गावोगावी सुरु झाली तर ग्रामीण भागातील तरुणांचा प्रशासनातील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८