शनिवार, १८ मे, २०१९

  !!  गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे निमित्ताने !!
       !!  डॉक्टर गांधी  !!
गांधीजींचा अलोपथी, आयुर्वेद या वैद्यकीय पध्दतीपेक्षा निसर्गोपचार पद्धतीवर अधीक भर होता. पाणी, माती, ताजी हवा आणि सूर्यकिरण यांची गांधीजींनी उपचारात मदत घेतली. त्यांचा भर उपवास, आहारात बदल आणि वनस्पतीच्या उपयोगावर होता.
         आजारी माणसाचे निरीक्षण करुन व्यवस्थित निदान करण्याची असामान्य शक्ती त्यांच्याजवळ होती. त्याचा त्यांना आजारी माणसावर उपचार करताना खूप उपयोग झाला. त्यामुळे आजारी माणसे बरी होत. दक्षिण आफ्रिकेत अनेक युरोपियन आणि भारतीय लोक त्यांचा सल्ला घेत ते त्यांच्या काही अशीलांचे फॅमिली डॉक्टर झाले होते.
         गांधीजींनी अनेकदा वैद्यकसत्ता नाकारली. कस्तुरबाना एकदा शरीरातील रक्त कमी होण्याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना गाईच्या मांसाचा काढा घ्यायला सांगितले पण गांधीजी आणि कस्तुरबा दोघांनीही ते नाकारलं. गांधीजींनी त्यांना लिंबाचा सरबत अनेक दिवस दिला आणि बर केले.
        दक्षिण आफ्रिकेत एकदा एका पठाणाने गांधीजींवर हल्ला केला तेव्हा गांधीजींनी चेहरा, कपाळ, आणि बरगड्यांना मुक्कामार बसला होता त्यावर स्वच्छ मातीचा लेप लावला आणि सूज लवकरच उतरली.
        आश्रमातील लोक विनोदाने म्हणत, "बापूंचा सहवास हवा असेल तर आजारी पडावं." आजारी माणसांच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी बापूंना माहीत असत. रुग्णाला स्पंजिग कसे करावे, मसाज कसा करावा, एनिमामध्ये किती सोडा आणि किती मीठ घालावे तेही सांगत. त्यांनी सेवाग्राममध्ये एक तास रुग्णासाठी द्यायला सुरुवात केली तेव्हा जवळपासच्या गावातून खूप रुग्ण येऊ लागले. गांधीजींचा सल्ला असे-भाज्या खा, ताक प्या, मातीच्या पट्ट्या लावा.कधी कधी ते रुग्णांची विष्टा तपासत.
  संदर्भ-बहुरूप गांधी   लेखक -अनु बंदोपाध्याय
  संग्राहक -राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...