!!आमची नर्मदा परिक्रमा !! (२० ) ओढ ... कोटेश्वर मंदिर
आमचा कालचा मुक्काम नर्मदा जिल्ह्यातील रुंडगाव येथील जलारामआश्रमात होता. या आश्रमात झोपल्यानंतर सरळ चंद्रदर्शन होत होते. याठिकाणी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने परिक्रमावासीयांना पांघरण्यासाठी ब्लॅंकेट दिले जात होते. हा आश्रम गावापासून खूपच दूर आहे परंतू परिक्रमावासीयांची चांगली काळजी घेतली जात होती. आज सकाळी उठल्यावर चहापान झाल्याशिवाय कोणालाही जायची परवानगी दिली नाही.
शेतीचा विचार केला तर हा भाग खूपच प्रगत असल्याचे दिसून आले. सर्वत्र केळीच्या बागा दिसत होत्या. काही ठिकाणी ऊस तर एरंडाची लागवड केली असल्याचे दिसून आले.
दिनांक ५/१२ ते ९/१२ या कालावधीत माझ्या वैयक्तीक अडचणीमुळे परिक्रमेत खंड पडला होता. नंतर माझ्या बरोबरच्या लोकांना गाठण्यासाठी मी खूपच धावाधाव केली. आठ दिवसाच्या प्रयत्नांनंतर आपल्या माणसांची भेट ओरा गावातील कोटेश्वर मंदिरात झाली.भेटीचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
आपल्या माणसांची ओढ काय असते हे मला प्रकर्षांने जाणवले. एखादी सासुरवाशीण माहेरी आल्यानंतर तिची जी भावना असते अगदी तशीच भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. प्रत्येकाला आपल्या माणसांची ओढ असते,ती ओढ प्रत्येकाच्या मनी असावी असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadehar #narmadaparikrama #narmadariver #shivaputri #koteshwar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा