गर्भसंस्कार आणि आयुर्वेद
गर्भसंस्कार का करावे – सुप्रजा म्हणजे निरोगी, सुदृढ, सुंदर, अव्यंग, सुबुद्ध, सुस्वभावी, कर्तुत्ववान अपत्य होण्यासाठी. आपल्याकडे म्हटले जाते – “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” ज्या पद्धतीने आपण जे बीज शेतामध्ये पेरतो त्या नुसार आपल्याला आलेले पिक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न असते. तेच आपल्या आयुष्यात आहे. बाळाची उत्पत्ती होण्यासाठी गर्भधारणा होणे गरजेचे असते आणि गर्भधारणा होण्यासाठी स्त्री च्या शरीरामध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होणे गरजेचे असते. यावेळी संयोग होणारे बीज सुधृढ नसेल तर पुढे गर्भाची वाढ आणि जन्मानंतर बाळाची योग्य वाढ होत नाही असे दिसून आले आहे. या करिता गर्भ संभावापासूनच जर योग्य आचार , विचार गर्भाच्या मनावर रुजवले तर त्याचा प्रभाव पुढील आयुष्यावर अधिक प्रमाणात दिसून येतो. Because Intrauterine stage is the most educable stage of life .
गर्भसंस्कार मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो.
बीजसंस्कार / बीजशुद्धी
लेखाच्या सुरवातील सांगितल्या नुसार “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” गर्भाची उत्पत्ती ही स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्या एकत्रीकरणामुळे होते. गर्भधारणेपूर्वी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची पंचकर्माने शुद्धी करणे यास बीजसंस्कार असे म्हणतात. बीज उत्तम असेल तर त्यापासून तयार होणारे फळ हे देखील उत्तमच मिळते. बीजसंस्कार करताना ते गर्भाची वाढ स्त्रीच्या शरीरात होणार आहे म्हणून फक्त स्त्री ची बीज शुद्धी न करता गर्भ उत्पन्न होण्यासाठी पुरुष बीज आणि स्त्री बीज दोघांची गरज असते त्यामुळे स्त्री बीज आणि पुरुष बीज दोघांची पंचकर्म करून शरीरशुद्धी करावी. पंचकर्म करून शरीरशुद्धी करताना त्याद्वारे बीजशुद्धी करता येते. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य ही पंचकर्म करता येतात.
गर्भसंस्कार बाबतची अधिक माहितीसाठी वैद्य श्रीधर यांचा गर्भसंस्कार या विषयावरील blog वाचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा