!!भवरलाल जैन स्मृतिदिन !!
(२५ फेब्रुवारी )
भवरलाल जैन जन्म : १२ डिसेंबर १९३७ मृत्यू : २५ फेब्रुवारी २०१६ हे एक भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक होते. राजस्थानातील जोधपूरजवळील आगोलाई या गावातून जैन कुटुंबीय वाकोद येथे स्थलांतरित झाले होते. भवरलाल जैन हे मुळात एक पारंपारिक शेतकरी होते. पण जळगावला आल्यावर शेती-उद्योग-शिक्षण-आर्थिक विकास आदींमधून त्यांची कारकीर्द बहरली. भवरलाल जैन यांनी ७ हजार रुपयांच्या अल्प भांडवलात उभ्या केलेल्या जैन उद्योग समूहाने पुढे ७ हजार कोटी रुपयांच्या पल्ला गाठला.
जैन उद्योग समूहाने अमेरिकाेतील कॅलिफोर्निया, मेक्सिको, ब्राझील, चिली, इस्रायल, युकेसह जगभरातील देशांत २९ कारखाने उभारले आहेत. कंपनीची १४६ कार्यालये असून तिने २९२९ वितरकांचे जाळे पसरले आहे. असे असले तरी जैन उद्योग समूहाचे मुख्यालय जळगावच ठेवले आहे.
भूमिपुत्र असलेल्या जैन यांनी सबंध भारताला सुजलाम सुफलाम करण्याचेही स्वप्न जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडची स्थापना करून पूर्णत्वास नेले. शेती व पाणी नियोजनामुळे असंख्य शेतकरी कुटुंबांना आर्थिक लाभ मिळून, त्यांच्या उत्पन्नात व राहणीमानात सुधारणा झाली. सुमारे २५० नवीन उद्योजकांनी प्रेरणा घेऊन भवरलाल जैन यांच्या औद्योगिक मॉडेलनुसार आपआपल्या औद्योगिक प्रकल्पांची रचना केली. त्यांच्या उद्योगप्रवण प्रेरणेने स्वयंरोजगार-शेतीपूरक लहानमोठ्या उद्योगांत लाखो माणसे लाभदायक कामात गुंतली.
भवरलाल जैन यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा