!! रवींद्र सदाशिव भट स्मृतिदिन !!
(२२ नोव्हेंबर )
रवींद्र सदाशिव भट जन्म:१७सप्टेंबर १९३९ मृत्यू:२२ नोव्हेंबर २००८ हे मराठी संतांचे चरित्र कादंबर्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला होता.
रवींद्र भट यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास १९६३ सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
रवींद्र भट यांची काही साहित्य संपदा
!! कादंबरी !!
अनादि मी अनंत मी ,आभाळाचे गाणे,इंद्रायणीकाठी,एका जनार्दनीं,घरट्यात मी एकटा,घास घेई पांडुरंगा,बंध विमोचन राम,देवाची पाऊले, भगीरथ,भेदीले सुर्यमंडला,सत्यम शिवम सुंदरम,सागरा प्राण तळमळला,हेचि दान देगा देवा,
!! नाटक !!
अरे संसार संसार,अवघी दुमदुमली पंढरी
असा नवरा नको गं बाई,एक कळी फुललीच नाही,केल्याने होत आहे रे,खुर्ची,
!! बालसाहित्य !!
कथा समर्थांच्या,जय गंगे भागीरथी,जय जय रघुवीर समर्थ,दिनांची माऊली,संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ,विवेकानंद,स्वातंत्र्यवीर
!! कवितासंग्रह !!
ओठावरले गाणे,खुर्ची,जाणता अ जाणता,मन गाभारा गाभारा,मोगरा फुलला,
!! ललित !!
कृष्णाकाठचा भुत्या ,योगसुखाचे सोहळे,
सारी पावले मातीचीच ,ज्ञानदेवा डोळा पाहू चला ,
रवींद्र भट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा