!! क्रांतिकारक उमाजी नाईक जन्मदिन !!
(७ सप्टेंबर )
उमाजी नाईक जन्मदिन:७ सप्टेंबर १७९१ मृत्यू:३ फेब्रुवारी १८३२
उमाजी नाईक हे महाराष्ट्रातील क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी १८२६ ते १८३२ च्या सुमारास भारतात ब्रिटीश राजवटीला आव्हान दिले होते.
उमाजी नाईक (रामोशी)यांनी
मराठा साम्राज्याचा नाश झाल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात एक लहानसे सैन्य उभे केले. त्यांच्या ब्रिटीशविरोधी जाहीरनाम्यात देशातील माणसांना परकीय राज्यकर्त्यांविरूद्ध संघर्ष करण्यास सांगितले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने १०,००० रुपयांची बक्षीस जाहीर केले. उमाजीला १५ डिसेंबर १८३१ रोजी उतरवली येथे पकडले आणि ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. ब्रिटिशांनी त्याला अटक केली, चौकशी केली आणि नंतर त्याला दोषी धरले आणि ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फाशी देण्यात आले.
मराठयांनी रामोशी समाजाला रात्रीची गस्त घालण्याचे काम दिले होते. या कामामुळे विशिष्ट गावातून कर घेण्याचा अधिकार होता. इंग्रजांनी मराठयांचा पराभव केल्यानंतर कर वसुलीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले त्यामुळे रामोश्यांनी ब्रिटिशांविरुध्द संघर्ष सुरु केला. उमाजी नाईक यांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केले होते. ब्रिटिश पायदळ,घोडदळ यांना ठार मारण्याची व त्यांची संपत्ती लुटण्याची आज्ञा रामोशी समाजाला त्यांनी केली होती.
उमाजींनी जेजुरीच्या पोलिस स्टेशनवर हल्ला केला आणि तिथे पोलिसांचा खून केला. जे ब्रिटीश आणि ब्रिटिश राज्याशी निष्ठावान होते त्यांना रामोशी लोक शिक्षा देत असत. उमाजी ब्रिटीश सरकार आणि शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार यांचे पैसे लुटून गरीब लोकांना देत असत. त्यांच्या चांगल्या कामामुळे उमाजींना गरीबांबद्दल प्रेम होते. यामुळे ब्रिटीश सरकारला सुरुवातीला पकडता आले नाही.त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्याची नियुक्ती केली. इंग्रजांनी फोडा आणि झोडा धोरण उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी राबवले.समाजातील लोक आमिषाला बळी पडले इतकेच नव्हे तर घरचेच भेदी झाले.
सामान्य जनतेत दहशत निर्माण होण्यासाठी उमाजी नाईक यांचा मृतदेह तीन दिवस लटकत ठेवण्यात आला होता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला क्रांतिकारी लढा उभारण्याचे श्रेय उमाजी नाईक यांच्याकडेच जाते. उमाजी नाईक यांच्यामुळे स्वातंत्र्यआंदोलनाला बळच मिळाले. इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल.
उमाजी नाईक यांचे गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी हे असुन दरवर्षी खासकरून रामोशी समाजातील लोक क्रांतीची ज्योत प्रज्वलित करुन आणतात व त्यांची जयंती साजरी करतात. आपण सर्वजणच
त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे पाईक होऊया.
उमाजी नाईक यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा