!! सेतू माधवराव पगडी जन्मदिन !!
(२७ ऑगस्ट )
जन्म:२७ ऑगस्ट १९१० मृत्यू:१४ ऑक्टोबर१९९४
हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले त्यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा अभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला.
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे ग्रंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशंसा केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.
सेतु माधवराव पगडी हे १९६० ते १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.
सेतू माधवराव पगडी यांना मिळालेले पुरस्कार:-
१)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी
२) “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या
ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार
३)मराठा मंदिर संस्थेकडून चरित्रकार
पदक
४)महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून न. चिं.
केळकर पारितोषिक
५)भारत सरकारकडून पद्मभूषण
पुरस्कार.
संकलक :राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा