!! मराठा बिझनेस फोरम !!
गुणवत्तापूर्ण काम हाच यशस्वीतेची पाया--
राजेंद्र मोहिते
मराठा बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या सातारा सिटी बिझनेस सेंटर येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योजक राजेंद्र मोहिते म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, ते गुणवत्तापूर्ण करा तेच काम आपणास यशोशिखरावर नेऊन पोहोचवते. गुणवत्तापूर्ण काम हाच यशस्वीतेचा पाया आहे. ते पुढे म्हणाले की, आपण नेहमी नवनवीन प्रयोग करावेत. कोणतेही काम करताना अडचणी येणारच. अडचणीवर तुम्ही कशी मात करता त्यावरच यश अवलंबून असते. नेहमी यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा वाचाव्यात. त्यांचे अनुकरण करावे. इतर व्यावसायिकानी कशी प्रगती केली आहे हे पाहिले पाहिजे. शासकीय अधिकारी यांचेशी आपला संपर्क चांगला असला पाहिजे. मार्केटिंगमध्ये आपली वाणी गोड असायला हवी. रिटायरमेंटचे वय नसते फक्त आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. नुसता तरुणपणाचा न्हवेतर साठ ते सत्तर वयोगटाचा काळही अधिक कार्यक्षमतेचा असतो. मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून उद्योजकतेला पोषक वातावरण तयार होत असलेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुरग्रामचे सुरेंद्र काकडे यांनी केले.ते म्हणाले की, प्रत्येकजण काम करण्यासाठी उत्सुक आहे फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. व्यावसायिकाना येणाऱ्या अडचणी फोरमच्या माध्यमातून सोडवल्या जातील. प्रगती करायची असेल तर वैचारिक मतभेद विसरले पाहिजेत. आपला व्यावसायीक अभ्यासही सखोल हवा.
यावेळी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी फोरम राबवत असलेल्या सर्व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सर्व व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती सांगितली. फोरमच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. आभार जगदिश शिर्के यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास अनेक व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमातून एकमेकांना भेटून, व्यवसाय वाढवण्याचे तंत्रच उपस्थित सदस्यांना मिळाले असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
गुणवत्तापूर्ण काम हाच यशस्वीतेची पाया--
राजेंद्र मोहिते
मराठा बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या सातारा सिटी बिझनेस सेंटर येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योजक राजेंद्र मोहिते म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, ते गुणवत्तापूर्ण करा तेच काम आपणास यशोशिखरावर नेऊन पोहोचवते. गुणवत्तापूर्ण काम हाच यशस्वीतेचा पाया आहे. ते पुढे म्हणाले की, आपण नेहमी नवनवीन प्रयोग करावेत. कोणतेही काम करताना अडचणी येणारच. अडचणीवर तुम्ही कशी मात करता त्यावरच यश अवलंबून असते. नेहमी यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा वाचाव्यात. त्यांचे अनुकरण करावे. इतर व्यावसायिकानी कशी प्रगती केली आहे हे पाहिले पाहिजे. शासकीय अधिकारी यांचेशी आपला संपर्क चांगला असला पाहिजे. मार्केटिंगमध्ये आपली वाणी गोड असायला हवी. रिटायरमेंटचे वय नसते फक्त आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. नुसता तरुणपणाचा न्हवेतर साठ ते सत्तर वयोगटाचा काळही अधिक कार्यक्षमतेचा असतो. मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून उद्योजकतेला पोषक वातावरण तयार होत असलेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुरग्रामचे सुरेंद्र काकडे यांनी केले.ते म्हणाले की, प्रत्येकजण काम करण्यासाठी उत्सुक आहे फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. व्यावसायिकाना येणाऱ्या अडचणी फोरमच्या माध्यमातून सोडवल्या जातील. प्रगती करायची असेल तर वैचारिक मतभेद विसरले पाहिजेत. आपला व्यावसायीक अभ्यासही सखोल हवा.
यावेळी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी फोरम राबवत असलेल्या सर्व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सर्व व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती सांगितली. फोरमच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. आभार जगदिश शिर्के यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास अनेक व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमातून एकमेकांना भेटून, व्यवसाय वाढवण्याचे तंत्रच उपस्थित सदस्यांना मिळाले असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८