!! कार्तिकी वारी पंढरीची !!(२)
मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पहाटे लवकर उठून चंद्रभागेत स्नानाचा आनंद लुटला आणि लवकरच गोपाळपूराकडे प्रस्थान केले. आमचे निवासस्थान नदीच्या पलीकडे असल्याने आम्हाला पूल ओलांडून यावे लागले.नदीस महापूर आल्याने आजही काही नदीकाठच्या मंदिरात पाणी आहे.विष्णूपद मंदिराचा भाग पाण्याने पूर्णपणे वेढलेला आहे.
गोपाळपूरमध्ये श्रीकृष्णासह अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. तेथे जनाबाईच्या संसाराची एक खोली आहे. त्याकाळात वापरात असलेल्या वस्तू प्रतिकात्मक स्वरूपात जतन करुन ठेवलेल्या आहेत. जनाबाईस प्रत्यक्ष पांडुरंग दळण दळू लागला असल्याचेही प्रतिकात्मक रुपाने मांडले आहे. येथे देवाला दही व लाह्या वाहणे तसेच एकमेकांना भरवण्याची प्रथा आहे.आम्हीही तो आनंद लुटला.
हा कार्यक्रम झाल्यानंतर काल्याच्या किर्तनासाठी मुळ निवासस्थानी आलो. सकाळी ८ ते १० यावेळेत ह.भ. प.केशवमहाराज हगवणे यांचे काल्याचे किर्तन झाले.
आजच्या किर्तन सेवेसाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला होता तो खालीलप्रमाणे--
माझे गडी कोण कोण! निवडा भिन्न यातुनी!!१!!
आपापणामध्ये मिळो!एक खेळो एकाशी !!धृ!!
घाबरियांच्या मिडा काड्या !धाड भ्याड वळतीया!!२!!
तुका म्हणे देवापाशी!विटाळशी नसावी !!३!!
महाराजांनी अभंगाचे सुंदर विवेचन केले. जीवनामध्ये खेळ विविध प्रकारचे आहेत उदा. बालपणीचा खेळ, संसार खेळ, भागवत भक्तीचा खेळ.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात प्रत्येकाने विचार करून कृती करावी. अविचारी कृतीचा काहीच उपयोग होत नाही. आपणास चांगल्या वाईटाची निवड करता आली पाहिजे.संघशक्ती महत्वाची,भ्याड भित्र्या लोकांमुळे यशप्राप्ती होत नाही. ज्याला देवाजवळ जायचे आहे त्याच्याकडे वाईट विचार असु नये. येथे विटाळ हा शब्द वाईट विचाराबद्दल वापरला आहे. आपणाकडील अहंकार प्रथम घालवला पाहिजे. मी ऐवजी आम्ही असे म्हणता आले पाहिजे.
किर्तन संपल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर महाप्रसाद घेतला.थोड्याचवेळात परतीच्या प्रवासाला निघालो. यावेळी मात्र माळशिरस, नातेपुते,फलटण,कोरेगाव या मार्गाने गावी परत पोहोचलो. तुलनेने बराचसा मार्ग चांगला होता त्यामुळे प्रवासदेखील आनंददायी झाला.
आजच्या दिवसातून जीवनात अहंकार नको, वाईट विचार नको,टीमवर्क महत्वाचे हा संदेश मिळाला असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पहाटे लवकर उठून चंद्रभागेत स्नानाचा आनंद लुटला आणि लवकरच गोपाळपूराकडे प्रस्थान केले. आमचे निवासस्थान नदीच्या पलीकडे असल्याने आम्हाला पूल ओलांडून यावे लागले.नदीस महापूर आल्याने आजही काही नदीकाठच्या मंदिरात पाणी आहे.विष्णूपद मंदिराचा भाग पाण्याने पूर्णपणे वेढलेला आहे.
गोपाळपूरमध्ये श्रीकृष्णासह अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. तेथे जनाबाईच्या संसाराची एक खोली आहे. त्याकाळात वापरात असलेल्या वस्तू प्रतिकात्मक स्वरूपात जतन करुन ठेवलेल्या आहेत. जनाबाईस प्रत्यक्ष पांडुरंग दळण दळू लागला असल्याचेही प्रतिकात्मक रुपाने मांडले आहे. येथे देवाला दही व लाह्या वाहणे तसेच एकमेकांना भरवण्याची प्रथा आहे.आम्हीही तो आनंद लुटला.
हा कार्यक्रम झाल्यानंतर काल्याच्या किर्तनासाठी मुळ निवासस्थानी आलो. सकाळी ८ ते १० यावेळेत ह.भ. प.केशवमहाराज हगवणे यांचे काल्याचे किर्तन झाले.
आजच्या किर्तन सेवेसाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला होता तो खालीलप्रमाणे--
माझे गडी कोण कोण! निवडा भिन्न यातुनी!!१!!
आपापणामध्ये मिळो!एक खेळो एकाशी !!धृ!!
घाबरियांच्या मिडा काड्या !धाड भ्याड वळतीया!!२!!
तुका म्हणे देवापाशी!विटाळशी नसावी !!३!!
महाराजांनी अभंगाचे सुंदर विवेचन केले. जीवनामध्ये खेळ विविध प्रकारचे आहेत उदा. बालपणीचा खेळ, संसार खेळ, भागवत भक्तीचा खेळ.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात प्रत्येकाने विचार करून कृती करावी. अविचारी कृतीचा काहीच उपयोग होत नाही. आपणास चांगल्या वाईटाची निवड करता आली पाहिजे.संघशक्ती महत्वाची,भ्याड भित्र्या लोकांमुळे यशप्राप्ती होत नाही. ज्याला देवाजवळ जायचे आहे त्याच्याकडे वाईट विचार असु नये. येथे विटाळ हा शब्द वाईट विचाराबद्दल वापरला आहे. आपणाकडील अहंकार प्रथम घालवला पाहिजे. मी ऐवजी आम्ही असे म्हणता आले पाहिजे.
किर्तन संपल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर महाप्रसाद घेतला.थोड्याचवेळात परतीच्या प्रवासाला निघालो. यावेळी मात्र माळशिरस, नातेपुते,फलटण,कोरेगाव या मार्गाने गावी परत पोहोचलो. तुलनेने बराचसा मार्ग चांगला होता त्यामुळे प्रवासदेखील आनंददायी झाला.
आजच्या दिवसातून जीवनात अहंकार नको, वाईट विचार नको,टीमवर्क महत्वाचे हा संदेश मिळाला असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा