!! वैदीक हर्बल फार्माला भेट !!
सातारा जिल्ह्यातील अतीत येथील मा. प्रकाश पवार यांनी आपल्या गावाशेजारीच निसराळे फाट्यावर वैदिक हर्बल फार्मा ही कंपनी १० वर्षांपूर्वी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये सर्व आयुर्वेदिक उत्पादने घेतली जातात. आपल्याच परिसरात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींची आपल्याला ओळख नाही. किंबहूना त्याचे महत्व आपणास माहीत नसते. आज त्यांच्याकडून अनेक दुर्मिळ वनस्पतींची माहिती मिळाली. कृषितज्ञ व आमची माती आमची माणसे, कृषिदर्शन, तंत्र नव्या शेतीचे या सारख्या शेतीविषयक मालिकांचे निर्माते मा. मानसिंग पवार यांच्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला.
प्रकाश पवार हे स्वतः एम. ई. प्रोडक्शन आहेत. ते वेगवेगळ्या औषधी वनस्पतीवर संशोधन करत आहेत. त्यांच्याकडे भाजीपाला, फळे पिकासाठी नुट्रीप्लस, आरोग्यासाठी हेल्थ प्लस, दूध वाढीसाठी बायो मिल्क प्लस, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बायो प्लॅन्ट ग्रोथ, कीटक नियंत्रणासाठी बायो कीटकनाशक, जमिनीची सुपीकता वाढीसाठी बायो भू सुधारक अशी उत्पादने घेतली जात आहेत. शतावरी कल्प बनवण्याचे कामदेखील मोठ्या प्रमाणावर चाललेले दिसून आले.
मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सेंद्रीय उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसून आले. शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी जैविक उत्पादने वापरावीत असे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
सातारा जिल्ह्यातील अतीत येथील मा. प्रकाश पवार यांनी आपल्या गावाशेजारीच निसराळे फाट्यावर वैदिक हर्बल फार्मा ही कंपनी १० वर्षांपूर्वी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये सर्व आयुर्वेदिक उत्पादने घेतली जातात. आपल्याच परिसरात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींची आपल्याला ओळख नाही. किंबहूना त्याचे महत्व आपणास माहीत नसते. आज त्यांच्याकडून अनेक दुर्मिळ वनस्पतींची माहिती मिळाली. कृषितज्ञ व आमची माती आमची माणसे, कृषिदर्शन, तंत्र नव्या शेतीचे या सारख्या शेतीविषयक मालिकांचे निर्माते मा. मानसिंग पवार यांच्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला.
प्रकाश पवार हे स्वतः एम. ई. प्रोडक्शन आहेत. ते वेगवेगळ्या औषधी वनस्पतीवर संशोधन करत आहेत. त्यांच्याकडे भाजीपाला, फळे पिकासाठी नुट्रीप्लस, आरोग्यासाठी हेल्थ प्लस, दूध वाढीसाठी बायो मिल्क प्लस, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बायो प्लॅन्ट ग्रोथ, कीटक नियंत्रणासाठी बायो कीटकनाशक, जमिनीची सुपीकता वाढीसाठी बायो भू सुधारक अशी उत्पादने घेतली जात आहेत. शतावरी कल्प बनवण्याचे कामदेखील मोठ्या प्रमाणावर चाललेले दिसून आले.
मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सेंद्रीय उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसून आले. शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी जैविक उत्पादने वापरावीत असे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८